

Akola News
esakal
मूर्तिजापूर: कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उघडकीस आलेल्या दोन कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेतकरी, अडते आणि बाजार समितीच्या व्यवहाराशी संबंधित घटकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.