Water Supply Issue : थकबाकी वाढली; ८४ गावांवर जलसंकट; पाणीपुरवठा होणार बंद

अकोला जिल्ह्यात ८४ आणि ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा यासारख्या प्रमुख याेजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येताे. मात्र पाणीपट्टी माेठ्या प्रमाणात थकली आहे.
Water crisis

Water crisis

sakal
Updated on

अकोला/अकोट - अकोट ८४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी मजीप्राला जिल्हा परिषदेकडून निधी मिळत नसल्याने मजीप्राने योजनेतून करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

त्यामुळे ८४ गावांवर जलसंकटाचे ढग दाटून आले असून हिवाळ्यातच ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. याबाबत मजीप्राने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पत्र लिहून २५ डिसेंबरपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com