

Akola News
esakal
अकोला: भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (आसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे.
या मोहिमेंतर्गत राज्यातील तब्बल ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यातही १६ लाखांहून अधिक मतदारांची माहिती घराघरात जाऊन तपासली जाणार असल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.