radhakrishna vikhe patil
radhakrishna vikhe patil esakal
अहमदनगर

शैक्षणिक फी सरकारने भरावी; राधाकृष्ण विखे पाटील

सतीश वैजापूरकर

राहाता : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा भार सरकारने उचलावा, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बोलताना केली.आमदार विखे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानात संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांना उपोषण करण्याची वेळ आली. या सरकारकडून फक्त बैठकांचा फार्स सुरू आहे. बंद दाराआड चर्चा करण्यापेक्षा सरकारने ऑनलाइन चर्चा करावी, अशी मागणी करून यावेळी आरक्षणाबाबतची सरकारची भूमिका किती प्रामाणिक आहे हे समजेल, असे मत व्यक्त केले.

आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क सरकारने भरावे, अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने शिर्डी मतदारसंघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना ५० टक्के शैक्षणिक शुल्क माफ केले. असा निर्णय करणारी राज्यातील एकमेव संस्था असल्याचे विखे पाटील म्हणाले..संभाजीराजे छत्रपतींकडून अभिनंदनआमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलेल्या शुल्कसवलतीचा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख करून, आमदार विखे पाटील यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT