अर्थविश्व

आनंद महिंद्रांनी कंपनीसाठी घेतला मोठा निर्णय, कोणता...

वृत्तसंस्था

मुंबई: महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या समूहातील कंपन्यांमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने या मुद्द्याकडे लक्ष वेधल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी हा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा सोशल मिडियावर सक्रिय असतात. त्यामुळे ट्विटरवरूनच त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांना बंदी घातल्याची माहिती दिली आहे. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येसुद्धा आनंद महिंद्रा यांनी हवामान बदलाच्यासंदर्भात पावले उचलण्याचा आग्रह धरला होता. एका ट्विटर वापरकर्त्याने आनंद महिंद्रा यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे फोटो टाकून त्या फोटोमधील असंख्य प्लॅस्टिक बाटल्यांकडे निर्देश केला होता. त्या ट्विटची दखल लगेच घेत आनंद महिंद्रा यांनी लगेचच हा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा ट्विटरवर कमालीचे कृतिशील आहेत. शाश्वत विकासाचाही ते पुरस्कार करत असतात. 

सुमारे 21 अब्ज डॉलर मूल्याच्या महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा अध्यक्ष आहेत. महिंद्रा समूह इलेक्ट्रिक कारचे सुद्धा उत्पादन करते आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आनंद महिंद्रा यांनी जगातील आघाडीचे उद्योगपती आणि व्यावसायिक यांनी एकत्र येऊन हवामान बदलासंदर्भात पावले उचलण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT