kashmir
kashmir file photo
देश

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ४३९ दहशतवादी ठार; केंद्राने दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद यांनी आकडेवारी जाहीर केली. तसंच एकूण किती जवान शहीद झाले याचीही त्यांनी माहिती दिली.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर झालेल्या दहशवतादी घटना आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद यांनी आकडेवारी जाहीर केली. तसंच एकूण किती जवान शहीद झाले याचीही त्यांनी माहिती दिली.

गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितलं की, जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर ४३९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये नागरीक आणि सुरक्षा दलाच्या जवानांना प्राण गमवावे लागले. ९८ नागरिकांचा मृत्यू तर १०९ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. कलम ३७० हटवल्यानंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये ५४१ चकमकीच्या घटना घडल्या आहेत.

याआधी राज्यसभेत दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांची माहिती देण्यात आली आहे. भारताने देशात एकूण ४२ संघटनांची दहशतवादी संघटनांच्या यादीत नोंद केली आहे. तसंच युएपीए अंतर्गत ३१ जणांची नोंद दहशतवादी म्हणून करण्यात आल्याचं त्यांनी राज्यसभेत सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT