देश

"जलिकट्टू' आंदोलनाच्या चौकशीचे आदेश

वृत्तसंस्था

चेन्नई: जलिकट्टू आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश आज तमिळनाडू सरकारने दिले. या संदर्भातील माहिती आज मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी दिली.

23 जानेवारीला जलिकट्टूच्या मुद्द्यावरून सरकारने अध्यादेश आणूनही मरिना बीचवर आंदोलन सुरूच होते. आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि राष्ट्रविरोधी प्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमल्याची माहिती विधानसभेला दिली. हा चौकशी आयोग तीन महिन्यांत सरकारला अहवाल सादर करेल, असेही सांगण्यात आले. चौकशी आयोग तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. आंदोलकांनी पोलिस ठाणे आणि गाड्या पेटवून दिल्या होत्या. तसेच शहरातील अनेक भागांत हिंसाचार घडवून आणल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करावा लागला. चौकशी आयोग या संपूर्ण कारवाईची माहिती घेणार असून, पोलिसांनी उचलेले पाऊल योग्य होते की नाही, याचीही चौकशी केली जाणार आहे. या घटनेत एकूण 487 जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यात 36 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT