karnataka election result 2023 congress won bharat jodo yatra politics
karnataka election result 2023 congress won bharat jodo yatra politics Sakal
देश

कार्यकर्त्यांबरोबरील संवाद ‘टर्निंग पॉईंट’!

सकाळ वृत्तसेवा

काँग्रेसची पारंपरिक लढत विरुद्ध भाजपची अत्याधुनिक यंत्रणा याला पहिल्यांदाच काँग्रेसने कर्नाटकात छेद दिला. गेल्या नऊ महिन्यांपासून एक केंद्रीय ‘वॉररुम’ स्थापत राबविलेली यंत्रणा या विजयासाठी महत्त्वाची ठरली आणि दुसरा गेमचेंजर ठरला तो म्हणजे थेट कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने ठेवलेला संवाद.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आज विजयाचा जल्लोष करत आहे. पण या निमित्ताने पहिल्यांदाच बदललेली काँग्रेस पाहायला मिळाली. आणि यासाठी कारणीभूत ठरली ती काँग्रेसने राबविलेली आधुनिक यंत्रणा. कर्नाटक निवडणूक जाहीर होणाच्या अनेक महिने आधीच या सगळ्याची तयारी सुरु झाली होती.

माजी आयएएस अधिकारी शशिकांत सेंथिल यांना कर्नाटक निवडणुकीसाठी संपूर्ण अत्याधुनिक यंत्रणा राबविण्याची जबाबदारी देण्यात आली. आणि येथून सुरुवात झाली ती बदललेल्या काँग्रेसची. या यंत्रणेत पहिल्यांदा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात आले.

ही तज्ज्ञ मंडळी अशी होती की ज्यांना थेट राजकारणात किंवा कुठल्याही पक्षाशी स्वतःला जोडून घ्यायचे नव्हते. पण विचारसरणीच्या दृष्टीने मदत मात्र करायची होती. त्यांच्या सहभागानंतर पहिले काम केले गेले ते म्हणजे विविध मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद. नेत्यांच्या पलीकडे जाणं काँग्रेसमध्ये तसं सहसा होत नाही.

पण इथे मात्र नेत्यांच्या ऐवजी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यात आला. याचा साहजिक फायदा झाला तो कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी. ही तळातील यंत्रणा काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरली गेली आणि साहजिकच त्याचा फायदाही पक्षाला झाला.

भ्रष्टाचाराचा मुद्दा अजेंड्यावर

दुसरे महत्त्वाचे धोरण ठरवण्यात आलं ते म्हणजे भाजपने ऐरणीवर आणलेल्या कोणत्याही मुद्दांना काँग्रेसने प्रत्युत्तर न देणे. या प्रक्रियेत सहभागी असणारा एक नेता साम शी बोलताना म्हणाला “भाजपने टिपू सुलतान पासून ते बजरंग बलीच्या घोषणेपर्यंत अनेक गोष्टी निवडणुकीत आणल्या.

पण कुठेही त्याला बळी पडायचे नाही हे धोरण ‘ट्रेनिंग’पासूनच्या प्रत्येक पावलावर ठसविले जात होते. दोनच मुद्दे भ्रष्टाचार आणि विकास हे काँग्रेसच्या ‘अजेंडा’वर होते. आणि शेवटपर्यंत त्याच मुद्दांवर राहण्यात पक्ष यशस्वी ठरला.

अर्थात यात महत्त्वाची भूमिका बजावली ती कार्यकर्त्यांबरोबरच्या संवादानेच. कोण काय प्रतिक्रिया देतंय यापासून ते कोण कसं काम करतंय या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवली जात होती. त्यावर वेळोवेळी उपाय केले जात होते. उदाहरणार्थ कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने भ्रष्टाचारावर पत्र लिहिले आणि मग काँग्रेसने आपला प्रचार त्याच मुद्द्याभोवती गोवला. ‘पे टू सीएम’ ही मोहीम यशस्वी झाली.

प्रत्येक उमेदवाराशी संपर्क

प्रत्येक स्थानिक भागासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर काँग्रेस काम करत गेली. राज्याचे पाच भाग करून त्या प्रत्येक भागाकडे लक्ष ठेवण्यासाठी एक संघ नेमला गेला. त्यातून २४ तास २२४ उमेदवारांशी आणि ‘‘इलेक्शन एजंट्स’शी संपर्क ठेवला गेला.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराच्या प्रशिक्षणापासून सुरु झालेला हा या यंत्रणेचा प्रवास अगदी मुद्दांवरुन न हटण्यापर्यंत झाला आणि दर पाच वर्षांनी सरकार बदलणाऱ्या कर्नाटकात यंदा काँग्रेसला लोकांनी आशीर्वाद दिला, त्यामुळे आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य त्यांना मिळू शकले.

एकी दाखविली

एरवी काँग्रेस म्हटली की नेत्यांमधील भांडणं, हेवेदावे, गटबाजी हेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण यावेळी काँग्रेसने जाणीवपूर्वक सर्व नेतृत्व एक असल्याचा संदेश दिला. वरची फळी म्हणजे कर्नाटकसाठी जबाबदार असणारे खर्गे, शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना तर एकत्र आणले गेलेच पण याच्या बरोबरीने कुठेही स्थानिक पातळीवर काही भांडणं, वाद असतील तर त्यात लक्ष घालून, संवाद साधून ते मिटविण्याचा प्रयत्न केला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : दोन हेवी वेट संघ भिडणार, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

SCROLL FOR NEXT