Jawaharlal Nehru
Jawaharlal Nehru 
देश

'नेहरूंच्या चुकीमुळे काश्‍मीरची ही अवस्था' 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरमधील अराजकतेला केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी कॉंग्रेसला जबाबदार ठरविले आहे. मागील कॉंग्रेस सरकारांनी केलेल्या घोडचुकांमुळे राज्यात ही स्थिती निर्माण झाली असून, याचा सिलसिला नेहरू यांच्या चुकांपासून सुरू होतो, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. जम्मू- काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत मांडण्यात आलेल्या कायदेशीर ठरावावर आयोजित चर्चेत सहभागी होताना सिंह यांनी पुन्हा इतिहासाचीच उजळणी केली. 

जम्मू- काश्‍मीरमध्ये सध्या जे काही सुरू आहे, त्याला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार असून, त्यानंतर आलेल्या कॉंग्रेस सरकारांनी देखील त्यांच्याच चुकांची पुनरावृत्ती केली. या चुकांचेच फळ म्हणजे राज्यातील विद्यमान स्थिती आहे, असा आरोपही त्यांनी केला. लोकांच्या इच्छेखातरच आम्ही राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केले होते, त्यांच्या इच्छेनुसार आम्ही माघार घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. 

विरोधकांचा आक्षेप 
जम्मू- काश्‍मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास सर्वच विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. लोकसभेत या संदर्भात मांडण्यात आलेल्या ठरावावर चर्चा करताना कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाने एस. आर. बोमानी खटल्यामध्ये दिलेल्या निकालाचे सरकारने उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. कारण कोणत्या पक्षाकडे बहुमत आहे किंवा नाही हे केवळ बहुमताच्या चाचणीतूनच स्पष्ट होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटल्याचा दाखला थरूर यांनी दिला. थरूर यांच्याप्रमाणेच तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अण्णा द्रमुकच्या सदस्यांनीदेखील हेच मत मांडले. 

महिला आरक्षण विधेयक मांडा 
संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक केंद्र सरकारने तातडीने सादर करावे, अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य पी.के.एस. टीचर यांनी आज शून्य प्रहरामध्ये लोकसभेत केली. त्यांच्या या मागणीला अन्य पक्षांच्या सदस्यांनी देखील पाठिंबा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT