देश

जन धन खात्यांवर सरकारची नजर

पीटीआय

नवी दिल्ली - जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या बॅंक खात्यांत असलेल्या शून्य शिल्लकीत अचानक मोठी वाढ होऊ लागली आहे. याची सरकारने दखल घेतली असून, यावर करडी नजर सरकारी यंत्रणांनी ठेवली आहे. पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर फक्त दोन दिवसांत बॅंकिंग व्यवस्थेत सुमारे दोन लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.

याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ""पैसा बदलून देणाऱ्या दलालांवर सरकारी यंत्रणांचे लक्ष आहे. बेहिशेबी संपत्ती घेऊन हे दलाल सोने आणि जडजवाहिरांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. यावर महसूल विभाग आणि सक्त वसुली संचालनालय नजर ठेवून आहे. जन धन योजनेअंतर्गत देशात बॅंक खाती नसलेल्या नागरिकांची बॅंकांमध्ये खाती उघडण्यात आली. ही खाती बहुतांश निष्क्रिय होती. यातील शिल्लक ही शून्य होती. आता या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ लागला आहे. अचानक जमा होऊ लागलेल्या मोठ्या रकमेची सरकारने दखल घेतली आहे. सरकारी यंत्रणा यावरल लक्ष ठेवून आहे.''

बंद केलेल्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटांचा बेकायदा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकारी यंत्रणा मागेपुढे पाहणार नाही.
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT