देश

गुजरातमधील गरिबी हिंसेचे कारण : राहुल गांधी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- गुजरातमधील गरिबी हेच तिथल्या हिंसेचे कारण असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले आहे. गरिबीची दहशत खूप वाईट असते. गुजरातमधील हिंसेचे खरे कारण तेथे वाढलेली बेरोजगारी आहे. तसेच, तिथल्या औद्यौगिकरणाला लगाम बसला आहे या कारणामुळे बेरोजगारी वाढतच आहे आणि यातूनच सामुहिक हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर, गुजरातमधील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्हींची अवस्था बिघडली आहे. बाहेर राज्यातून येणाऱया कामगारांवर हल्ले करणे ही चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या गोष्टीच्या आपण पूर्णपणे विरोधात उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

दरम्यान, गुजरात मधील साबरकांठा येथे 28 सप्टेंबर या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात एक बिहारी मजूराला पोलिसांनी अटक केले होते. या अटकेमुळे स्थानिक संघटनांनी बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर निशाणा साधून त्यांना मारहाण, धमक्या देण्यात सुरूवात केली. या भितीमुळे हजारो नागरिकांनी गुजरातमधून पळ काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT