Kunal Patil
Kunal Patil
ganesh article

दर वर्षी गणेशस्थापना अन् विसर्जन का?

नरेंद्र धारणे (नाशिक)

आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी गणेशस्थापना आणि विसर्जन का केलं जातं?

गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला गेला. आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी गणेशस्थापना आणि विसर्जन का केलं जातं?

श्रीगणेश पुराण धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्रीगणेशाची आराधना केली आणि गणपतींना महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपतींनी होकार दिला. हे लिखाण दिवस-रात्र चालले आणि त्यामुळे गणपतींना थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज्य झाले. अशा वेळी गणपतींच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यासांनी श्री गणपतींना मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतींची यथासांग पूजा केली.

मातीचे लेपन केल्याने गणपती आखडून गेले म्हणून त्यांना पार्थिव मृण्मय गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यासांनी गणपतीकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते.

तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतींना पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसांत व्यासांनी गणपतींना खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हापासून गणपती बसविण्याची प्रथा पडली. लोकमान्य टिळकांनी समाजजागृती आणि प्रबोधन यासाठी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. ती प्रथा आजही अव्याहत आणि अखंडितपणे सुरू आहे.
मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT