हिंगोली - सिध्देश्वर धरणाचे सलग तिसऱ्या दिवशीही बारा दरवाजे उघडले,पुर्णा नदी पात्रात १४५६० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी शेती जलमय झाली आहे. बीडमध्ये तरुण मांजरा नदीच्या पुरात वाहून गेला आहे. कळंबमध्ये सोयाबीन पिक पाण्यात गेले आहे. औरंगाबादेतून जाणाऱ्या नागपूर-शिर्डी महामार्ग नदीला आलेल्या पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. परभणी जिल्ह्यात बैलगाडी वाहून गेली. चार जण सतर्कतेमुळे बचावले आहेत.
बीड जिल्ह्यातील धानोरात कंबरे इतक्या पाण्यात सोयाबीनचे पिक गेले आहे.बीड - रात्रीच्या पावसाने कवडी नाल्याला पाणी आल्याने धानोरा - तटबोरगाव, धानोरा - आपेगाव रस्ता बंद झाला आहे.बीड - पिके पाण्यात गेली आहेत.बीड - अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात गुरुवारी (ता.२३) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसाने मांजरा नदी काठ, ओढे-नाले परिसरातील शेती जलमय झाली आहे.बीड - तटबोरगाव लगतच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.कळंब (जि.उस्मानाबाद) - कळंब-ढोकी मार्गावरील पर्यायी पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली.बीड : केज तालुक्यात संततधार पावसाचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
लातूर - अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या पावसामुळे अहमदपूरमधील मन्याड नदीला पूर आला आहे. त्यामुळे लातूर-कारेपूरमार्ग अहमदपूर रस्त्यावरील खानापूर येथील पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद आहे. औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव नदीला पूर आल्याने नागपूर-शिर्डी महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.रुई ( ता. उस्मानाबाद) : तेरणा नदीच्या पात्राच्या अलीकडे असलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.