कोकण

रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही निर्बंध; प्रशासनाचा निर्णय

- राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासाने अत्यावश्यक सेवेवरही बंधने आणली आहेत. ही अंमलबजावणी आजपासूनच सुरू झाली आहे. जिल्ह्यात सर्व किराणा दुकाने बंद करून घरपोच सेवा सुरू केली जाणार आहे. मेडिकलमध्ये कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी लागत आहे. दुकाने उघडे दिसल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यात काल एका दिवसांत ४१७ कोरोना रुग्ण सापडले. तर ६ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याला रोख घालण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या किरणामाल दुकाने, मेडिकल यांच्यावरही निर्बंध घातले आहेत. किराणा दुकानदारांना घरपोच सेवा देण्याचे बंधनकारक केले आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने फक्त घरपोच सेवा देणार आहेत. उद्या कोणतेही दुकान उघडे दिसल्यास संबंधितांवर प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहायचाय? मग, महाराष्ट्राच्या 'या' माऊंट एव्हरेस्टला नक्की द्या भेट

T20 WC 24 Team India : T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT