Marathi News_Paali_farmers are not compensated for the compensation.
Marathi News_Paali_farmers are not compensated for the compensation. 
कोकण

ओखीमुळे शेतकरी, बागायतदार आणि विटभट्टी चालक आर्थिक गर्तेत

अमित गवळे

पाली (जि. रायगड) - ओखी वादळामुळे जिल्ह्यात फळभाज्यांचे मळे, कडधान्य पिके, भाताच्या मळण्या, आंबा बागा व विटभट्ट्या यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी केली आहे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास रायगड जिल्हा व कोकणातील शेतकर्‍यांचे संघटन उभारुन व्यापक स्वरुपात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा उतेकर यांनी दिला. नुकसान भरपाई मिळावी याकरीता बळीराजा शेतकरी संघाचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेणार आहे. बळीराजा शेतकरी संघाने केलेल्या नुकसान भरपाईच्या मागणीला शेतकरी, बागायतदार व विटभट्टी व्यावसायिकांनी पाठींबा दर्शविला आहे. बळीराजा शेतकरी संघाचे सुधागड तालुकाध्यक्ष अरविंद फणसे यांनी या संदर्भात शेतकर्‍यांना संघटीत करण्यास सुरुवात केली आहे. 

नुकसानीला सीमा नाही -
जिल्ह्यात भाताचे पिक घेतल्यानंतर अनेक ठिकाणी पालेभाज्या, कडधान्ये, वाल, पावटा, मटकी, हरभरा, मुग, मटकी, चवळी, तूर आदी कडधान्याची लागवड केली आहे. शेतकऱ्याने शेतात श्रम, वेळ व पैसा खर्च केला आहे. पावसामुळे भाजीपाला व कडधान्य शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या मळण्या देखील भिजून मोठे नुकसान झाले आहे. याबरोबरच विटभट्टी व्यावसायिकांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. अचानकपणे आलेल्या पावसाने विटभट्टीला लागणारा कच्चा माल भिजून गेल्याने संपुर्ण विटभट्ट्यांचे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याला आलेला मोहर गळून पडला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. मागील वर्षी देखील परतीच्या पावसाने अशाच स्वरुपाचे नुकसान केले होते. परंतू शासनाकडून शेतकर्‍यांना नुकसानीच्या तुलनेत कमी भरपाई मिळाली, असे एका शेतकऱ्याने 'सकाळ'ला सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT