कोकण

असगोली गावाला डॉ. नातूंनी फसवले - भास्कर जाधव

सकाळवृत्तसेवा

गुहागर -  गुहागर नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळण्याबाबतची पहिली अधिसूचना जाहीर झाली, मात्र अद्याप असगोली गाव वगळल्याचे नोटिफिकेशन निघाले नसून ते निघणारही नाही. डॉ. विनय नातूंचे कर्तृत्व मोठे असून, त्यांनी असगोलीला फसवले आहे. आनंदोत्सवाची मिरवणूक काढून आपले हसे ही करून घेतल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. 

नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीसाठी गुहागरमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार जाधव गेले दोन दिवस नगरपंचायत दौऱ्यावर आहेत. आमदार जाधव म्हणाले की, नगरपंचायतीमधून असगोली गाव वगळण्याबाबत पहिली अधिसूचना जाहीर झाली. यावर हरकती आल्या नाहीत, मात्र त्यानंतर नगरपंचायतीमधून असगोली वगळल्याचा आदेश आलेला नाही. असे असताना भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी असगोलीचा विश्वासघात केला. असगोलीला वगळल्याची खोटी माहिती दिली.

विश्वासघात करण्याच्या भाजपच्या संस्कृतीला ग्रामस्थ बळी पडले. २५ ऑक्‍टोबरपर्यंत आदेश शासनाने काढले नाहीत तर असगोली, नगरपंचायतीपासून वेगळे होऊ शकत नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT