india.
india. 
क्रीडा

Aus vs Ind: कांगारुंच्या बाल्लेकिल्ल्यात टीम इंडियाने रचला इतिहास; मालिका 2-1 ने जिंकली

सकाळन्यूजनेटवर्क

भारताने औस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. चौथ्या दिवसाअखेर टिम इंडियाने बिन बाद 4 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी रोहित-शुभमनने संयमी खेळी करत खेळाला सुरुवात केली. पॅट कमिन्सने रोहितला माघारी धाडत टिम इंडियाला पहिला आणि मोठा धक्का दिला होता. रोहित शर्मा 21 चेंडूत 7 धावा करुन माघारी फिरला आहे. त्यानंतर युवा शुभमन गिलनं पुजाराच्या साथीनं डाव सावरला होता. गिलनं कसोटी कार्दितील दुसरे अर्धशतकही पूर्ण केले. 

शुभमन गिल आणि पुजाराने दमदार भागिदारी करत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची खेळी केली. शतकाच्या उंरठ्यावर असलेल्या शुभमन गिलला शतकी कसोटी  सामना खेळणाऱ्या लायनने बाद केले. शुभमन गिलने 91(146) धावा केल्या. पुजारा अर्धशतकी करुन माघारी फिरला. त्यानंतर पंतने अर्धशतक पूर्ण केले.  पंत आणि मयांक अगरवाल ही जोडी मैदानात असून जवळपास 15 षटकात टीम इंडियाला 69 धावा करायच्या आहेत.

भारताने औस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. हा सामना तीन विकेट्सनी जिंकला आहे. या सामन्याबरोबरच भारताने ही सिरीज 2-1 ने जिंकली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT