Relationship
Relationship sakal
लाइफस्टाइल

नात्यासाठी हवा ‘संवाद’उपचार

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मलिहा साबळे, मानसिक आरोग्य तज्ज्ञ, संस्थापक व संचालक - द हेल्दी माइंड

दोन व्यक्तींमधील नातेसंबंध घट्ट करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समज आवश्यक आहे; परंतु त्याच वेळी प्रयत्न दोन्ही बाजूंकडून असले पाहिजेत आणि समज परस्पर असावी. वैवाहिक जीवनात एकाला अमर्याद स्वातंत्र्यासह जगण्याची इच्छा असते आणि आपल्या जोडीदाराबरोबरही; पण आपल्या मनासारखं नाही घडलं, तर नातेसंबंधांवर परिणाम होतात.

आपण पती-पत्नीच्या नातेसंबंधांबद्दल बोलतो, तेव्हा दोन्ही व्यक्तींची जीवनं भावनिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून असतात. मग तीव्र भावनिक अवलंबित्वामुळे नातेसंबंध संपुष्टात आणणं योग्य आहे का?

माझ्या अनेक वर्षांच्या सरावात मी अशा दुभंगलेल्या नातेसंबंधांची प्रकरणं पाहिली आहेत- ज्यात पत्नी आणि पती यांना त्यांचे विचार एकमेकांपुढे स्पष्ट करण्यासाठी सतत वाद घालण्याची गरज भासते- खरं तर बहुतेक प्रकरणांमध्ये खरी समस्या एक व्यक्ती किंवा दोघेही असतात.

पती किंवा पत्नी भावनिक आघातातून जातात, ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्यांच्या भूतकाळातील क्लेशकारक आठवणी (उदाहरणार्थ, पालकांबाबतची क्लेशकारक घटना) सध्याच्या परिस्थितीशी जोडायला सुरू करते. आपल्या हे लक्षात आलं पाहिजे, की हे मनच त्या घटनांना आजच्या परिस्थितीशी जोडतं.

खरं तर, पत्नी किंवा पती दोघांचाही दोष नाही, जी चूक आहे ती बाहेरच्या परिस्थितीची आहे. त्यामुळे एकमेकांमधील नातं बिघडू देऊ नका. जे तुम्हाला माहीत आहे, त्यासाठी सतत झगडत राहणं अयोग्य आहे. आपण त्यावर नियंत्रण ठेवलं, ते हाताळलं तर गोष्टी सोप्या होऊ शकतात.

एक मेंटल हेल्थ क्लिनिशियन असल्याने, मी अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत- ज्या एका सोप्या; पण सातत्यपूर्ण उपायानं सोडवल्या गेल्या आहेत. हा उपाय म्हणजे ‘संवाद’. केवळ आपण एकमेकांवर भावनिकदृष्ट्या अवलंबून आहोत किंवा आपल्याला समोरच्या व्यक्तीची गरज आहे असं भासवणं पुरेसं नाही, तर आपण व्यक्तही केलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आपल्याला भीती वाटत असल्यास आपल्या जोडीदाराला सांगितली पाहिजे आणि एक व्यक्ती चिंता व्यक्त करत असते, तेव्हा दुसऱ्यानं प्रतिक्रिया न देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तुमच्या जोडीदाराला शांत राहायला सांगा आणि त्यांना समजावून सांगा, की आपल्या दोघांना एकत्रपणे या समस्येवर काम करायचं आहे, एकत्र राहायचं आहे. बोलण्यापेक्षा दुसरा चांगला उपचार नाही. बोला आणि जादू पाहा. मनात जे असेल ते एकमेकांजवळ व्यक्त करा, एकमेकांना समजून घ्या आणि संवाद चालू ठेवा. चला मग भेटू या पुढच्या आठवड्यात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT