Loksabha 2019

Loksabha : युतीचा पराभव करायचा असल्यास एकत्र या : अजित पवार

वृत्तसंस्था

मुंबई : भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले. 

महाआघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे. तसेच यावेळी त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. महाआघाडीत सामील न होणारे भाजपची 'बी टीम' म्हणून काम करत आहेत.   

तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एनडीए सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. मताचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या सरकारने केले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच भाजप-सेनेचे मंत्री जुमलेबाज आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT