Loksabha 2019

LokSabha 2019 : सोशल मीडियावर नियंत्रण कधी?

सकाळवृत्तसेवा

नागपूर -  मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने उमेदवाराला सोशल मीडियाच्या खात्यांची माहिती देणे  बंधनकारक केले आहे. जवळपास सर्वच पक्षांकडून अर्ज भरण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रचार सुरू झाला आहे. यावर नियंत्रण केव्हा येणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच हा आचारसंहितेचा भंग नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शाब्दिक वार, हल्ला-प्रतिहल्लाही सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसत आहे. प्रचारासाठी हे प्रभावी माध्यम आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. 

निवडणूक आयोगाला  नोटीसही बजावली असून, नियमावली तयार करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, आतापर्यंत नियमावली तयार झालेली नाही. आयोगाने उमेदवारांना सोशल मीडियाच्या खात्यांची माहिती अर्जात सादर करण्याची अट घातली आहे. राजकीय पक्षांच्या संदर्भात मात्र कुठलीही भूमिका घेतली नाही किंवा माहिती देण्याचे बंधनकारक केले नसल्याचे सांगण्यात येते.

१८ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असली तरी अनेकांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या अधिकृत खात्यावरूनही प्रचार करण्यात येत आहे. हा प्रचार करताना कोणत्याही पक्षाने निवडणूक  विभागाची परवानगी घेतली नाही.  विशेष म्हणजे निवडणूक विभागाकडूनही त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना देण्यात आली नाही. आयोगाच्या सूचना नसल्याने काहीच करता येत नसल्याने अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

उमेदवारांवर कारवाईची नाही तरतूद
निवडणूक आयोगाने अर्जामध्ये उमेदवारांना सोशल मीडियाच्या खात्यांची माहिती देणे  बंधनकारक केले आहे. तसेच उमेदवारास गुन्ह्यांची जाहिरातीच्या माध्यमातून माहिती देणे बंधनकारक केले आहे. माहिती न दिल्यास किंवा दिल्यावर सोशल मीडियाचा वापर केला आणि गुन्ह्यांची माहिती न दिल्यास संबंधित उमेदवारावर कारवाईसंदर्भात कोणतीही तरतूद केली नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा नियम दात नसलेला वाघ ठरणार असल्याचे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT