महाराष्ट्र

बोगस बालगृहांना झटका

संजय मिस्कीन

मुंबई - राज्यातील बोगस बालगृहांतील बनावट मुलांच्या प्रवेशाद्वारे कोट्यवधी रुपयांच्या अनुदान वितरण मुद्द्यावरून वादात सापडलेल्या महिला व बालविकास विभागाने मरगळ झटकत या धंदेवाईक बालगृहांना झटका देत बालगृहांची दुकानदारी बंद पाडण्याच्या दिशेने पाऊल टाकणारा शासन निर्णय जारी करत बालगृहांना परवाना देण्यासाठी तीन विभागाच्या सचिवांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

बाल न्याय अधिनियम २०१५च्या कलम ४१नुसार बालगृहे चालवण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाने ५ मे २०१८ ला परिपत्रक जारी करून संस्थांना ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यासाठी २० मे २०१८ ची मुदत दिली होती, त्यानुसार ३६ जिल्ह्यांतून सुमारे ८५० संस्थांनी प्रस्ताव सादर केले. त्यापैकी दहा जिल्ह्यांचे प्रस्ताव विभागाने ५ नोव्हेंबर २०१८ रोजी अवैध ठरवून फेटाळले. 

दरम्यान, स्वयंसेवी संस्थांचे १३५ आणि शासकीय ४० बालगृहांचे प्रस्ताव छाननीत योग्य असल्याचा दावा विभागाने केला आहे. त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी शासन निर्णय काढून महिला व बालविकास विभागासह आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या तीन सचिवांची समिती स्थापन  केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT