Sharad-Pawar
Sharad-Pawar 
महाराष्ट्र

सरकारने कोणता शब्द पाळला? - शरद पवार

सकाळवृत्तसेवा

परळी (जि. बीड) - मराठवाड्यासह महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकारने शेतकरी, सामान्यांना वाऱ्यावर सोडले. संकटग्रस्त जनतेच्या मागे उभे राहण्याची दानत या सरकारमध्ये नाही. सरकारकडून शंभर टक्के फसवणूक झाल्याची भावना जनतेच्या मनात आहे. तरुणांची फसवणूक झाली, मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीची वेळ आली तरी धनगर आरक्षणाचा निर्णय नाही, मराठा आरक्षण न्यायालयात अडकले आहे, मुस्लिम समाजाचे आरक्षण न्यायालयाने मान्य करूनही सरकार देत नाही. सरकारने कोणता शब्द पाळला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप, महाआघाडीची नांदेडनंतर दुसरी संयुक्त सभा येथे शनिवारी (ता. २३) झाली. त्यावेळी पवार बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे ॲडव्होकेट जनरल म्हणून काम करणारे आता न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. धर्माच्या नावाने विद्वेष पसरवला जात आहे. सरकारच्या मनात दलित, आदिवासी, सामान्यांबद्दल आकस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT