Post-Voting
Post-Voting 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : टपाली मतदानाच्या मागणीत २० पट वाढ

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी टपाली मतदान करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जांमध्ये यंदा २० पटींनी वाढ झाली आहे. मुंबईत सुमारे ५० हजार पोलिस कर्मचारी आहेत. त्यातील दहा हजारांहून अधिक जणांनी टपाली मतदानासाठी अर्ज केला आहे. २०१४ मध्ये केवळ ५०० पोलिसांनी अर्ज केले होते.

राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मतदारसंघातच बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना मतदानासाठी काही वेळ सूट दिली जाते; पण अनेक पोलिस मुंबईबाहेर मतदानाचा हक्क बजावतात. मुंबईबाहेरील मतदारसंघांत अनेकांची नोंद असते. अशा परिस्थितीत त्यांना मतदानाचा हक्क बजावणे शक्‍य होत नाही. त्यामुळे अशा पोलिसांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था केली जाते. 

यंदा आतापर्यंत १० हजारांहून अधिक जणांनी अर्ज केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT