नागपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी कुही तालुक्‍यातील धान उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
नागपूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी कुही तालुक्‍यातील धान उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 
महाराष्ट्र

नव्या आघाडीसाठी आणखी एक पाऊल

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतलेल्या  शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नव्या संभाव्य आघाडीने किमान समान कार्यक्रमाच्या आखणीसाठी कंबर कसली आहे. शेतकरी कर्जमाफी व बेरोजगारीच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्यक्रम मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आज या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीची वांद्रे येथील अज्ञात स्थळी बैठक झाली. सुमारे चार तास झालेल्या या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीला शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व एकनाथ शिंदे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, छगन भुजबळ व नवाब मलिक, तर काँग्रेसच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते. आज या तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यातील घोषणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या तिन्ही जाहीरनाम्यातील समान दुवे असणाऱ्या योजना एकत्रित करून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यास आज सुरुवात झाली आहे. 

राज्यातला शेतकरी दुष्काळासोबतच व अवकाळी पावसाने उद्‌ध्वस्त झाला आहे. फळबागांचे झालेले नुकसान चिंताजनक आहे. त्यामुळे लहान, अल्पभुधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांसह फळबागायतदारांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्याचा मानस किमान समान कार्यक्रमात अंतर्भूत करण्याची तयारी सुरू असल्याचे कळते. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईसाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयांपर्यंत मदत करण्यासाठीही या समन्वय समितीमध्ये चर्चा सुरू असून मदतीचा आकडा अद्याप निश्‍चित झालेला नाही. 

काँग्रेस व राष्ट्रवादीची सरसकट कर्जमाफीची भूमिका होती, तर सातबारा कोरा करण्याची घोषणा शिवसेनेने दिली होती. त्यामुळे, कर्जमुक्‍त शेतकरी करण्याच्या दिशेने या नव्या आघाडीत सखोल चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याआड अदृश्‍य शक्ती काम करत आहे, ‘मातोश्री’मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील मोदींपर्यंत पोचविलाच गेला नाही.
- संजय राऊत, नेते शिवसेना

शिवसेनेने कोणत्याही पर्यायाचा फारसा विचार न करता भाजपसोबतच सत्ता स्थापन करावी, भाजपनेही राज्याच्या हितासाठी तडजोड करावी. 
- रामदास आठवले, अध्यक्ष रिपाइं

शिवसेनेला पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये स्थान मिळण्याची शक्‍यता कमी आहे, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे जोसेफ गोबेल्स आहेत.
- राम माधव, नेते भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT