महाराष्ट्र

शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा - प्रतापराव पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा. शेतकऱ्याने प्रयोग करावेत, शेतीपुढील प्रश्न कसे सोडवावेत, याचा विचार करावा, त्याला सरकारसह कुणाच्याही मदतीची गरज भासू नये, असे प्रयत्न करावेत,’ असे प्रतिपादन 'सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी येथे केले. 

सकाळ-अॅग्रोवनच्या स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, की लोकांच्या साहाय्याने लोकांना सोबत घेऊन लोकांसाठी काम करायचे ही दैनिक ‘सकाळ’ची परंपरा आहे. व्यवस्थेत शेतकरी हा मोठा वर्ग आहे. हे जाणून ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी जेव्हा अॅग्रोवनची संकल्पना मांडली तेव्हा सुरवातीला काहींनी हा वेडेपणा ठरवला. शेतकरी वाचत नाही, तेव्हा कुठे हे वृत्तपत्र चालणार, अशी चर्चा झाली. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतःच हा गैरसमज खोटा ठरवला आहे. 

‘सकाळ’ला राज्यातील दुष्काळी भागांत पाण्याबाबत सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सुमारे ५०० गावे टंचाईमुक्त करण्यात यश आले. हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. कोट्यवधींची उलाढाल शक्य झाली असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, महिलांची मोठी शक्ती नजरेसमोर ठेवून महिलांसाठी तनिष्का हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आत्महत्या करतात, याची खंत व्यक्त करताना त्यांनी महिला मात्र जिद्दीने उभी राहते, ती कधीही आत्महत्या करीत नाही, ती संकटाचा धाडसाने मुकाबला करते, असे सांगत महिलांमध्ये असे अलौकिक सामर्थ्य असते, याचा उल्लेख केला. हे सांगत असताना त्यांनी अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार मिळालेल्या ज्योतीताई देशमुख यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात काम करायची इच्छा निर्माण होण्यासाठी हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगून चांगलं घडतंय, घडू शकतंय हे सांगायचा उद्देश त्यामागे असल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा. शेतकऱ्याने प्रयोग करावेत, नाशिकच्या सह्याद्री अॅग्रो फुड्ससारख्या संस्था उभाराव्यात, शेतीपुढील प्रश्न कसे सोडवावेत, याचा विचार व्हावा, त्याला सरकारसह कुणाच्याही मदतीची गरज भासू नये असे प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आगामी काळातही शेतकऱ्याला आणखी काही नवीन देता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे मिळावं यासाठीसुद्धा सकाळ प्रयत्नशील असल्याचे सांगताना पुढील वर्षी याबाबत विस्ताराने बोलेन, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT