Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP 
महाराष्ट्र

शिवसेना म्हणणार 'अब की बार, फिर मोदी सरकार'; युती निश्चित

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज (सोमवार) भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करतील.  

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज 'मातोश्री'वर येत आहेत. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकीपासून शिवसेनेने या जागेची मागणी केल्याने भाजपने पालघरच्या जागेवरही पाणी सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय विधानसभेच्या जागावाटपावरही बोलणी झाल्याचे समजते. विधानसभेसाठी शिवसेनेची 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी 144-144 जागांवर लढणार आहेत.

शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेच्या नेत्यांनी सोडली नाही. युतीबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंपासून सर्वच शिवसेना नेत्यांनी आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिला होता. मात्र भाजप नेत्यांनीही युती होणार असा विश्‍वास वारंवार व्यक्त केला होता. त्यामुळे युतीची घोषणा होत असल्याने युतीबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यापासून युतीवर शिक्‍कामोर्तब झाल्याचे मानण्यात येत होते अखेर यावर शिक्कामोर्तब झाले. 

लोकसभेसाठी 
भाजप : 25 
शिवसेना : 23 

विधानसभेसाठी 
भाजप : 144 
शिवसेना : 144 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT