महाराष्ट्र

धुळ्याची 'सुरत' बदलू : पंतप्रधान मोदी

सकाळवृत्तसेवा

धुळे : धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी; तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत' बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. 

येथील मालेगाव रोडवरील गो-शाळेच्या खुल्या जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी सव्वातीनला सभा झाली. सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्याच्या साक्षीने धुळ्यासह खानदेशच्या भविष्यातील विकासाची गुंफण पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यांनी "धुळ्याचे सुरत होण्यासाठी अपेक्षित आत्मविश्‍वास धुळेकरांमध्ये आहे ना, धुळे पुढे जाऊ शकते ना, सुरतसारखे शहर बनू शकते ना, आगामी तीस वर्षांचा धुळे जिल्हा विकासाचा आराखडा केला तर तो स्वीकारणार ना, या दिशेने वाटचाल करणार ना', यावर जनसमुदायाकडून होकार मिळवत सर्वांसोबत राहण्याची ग्वाही दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, की धुळ्याच्या विकासासाठी अब्जावधीच्या निधीतून साकारणाऱ्या योजनांचे लोकार्पण, पायाभरणी, उद्‌घाटन झाले. पाणी, सिंचन, दळणवळणाच्या रेल्वे, महामार्गासारख्या सोयीसुविधांमुळे धुळ्याचा सुरतसह देशातील "कनेक्‍ट' वाढणार आहे. तो औद्योगिक विकास, व्यापारवृद्धी आणि रोजगारनिर्मितीसाठी पूरक ठरणार आहे. 

सिंचनासाठी पुढाकार 

धुळे जिल्ह्यातील तापी नदी ही जीवनवाहिनी असली तरी तिच्या क्षेत्रात दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तिष्ठत राहावे लागते, अशी खंत व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले, की धुळे शहरालाही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ते लक्षात घेता केंद्र सरकारने अमृत योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत हे चित्र बदलण्यासाठी पुढाकार घेतला.

या सिंचन योजनेंतर्गत रखडलेले 99 प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प केला. त्यात महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचा समावेश असून 35 वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात 21 कोटींच्या किमतीचा व सद्यःस्थितीत पूर्ण झालेला अक्कलपाडा सिंचन प्रकल्प आज 550 कोटींच्या खर्चावर पोचला. याप्रमाणे महाराष्ट्रात रखडलेली प्रकल्प पूर्ण करणे व दुष्काळ निर्मूलनासाठी 14 हजार कोटींचा निधी दिला आहे. असे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या राज्यात पावणेचार लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल. 

मोदींची अहिराणीतून साद 

व्यासपीठावर भाषणासाठी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिराणीतून संवाद साधत जनसमुदायाची मने जिंकली. "आठे जमेल तमाम खानदेशना भाऊ-बहिणीसले मना मनःपूर्वक नमस्कार. तुम्ही इतला लोके मले आशीर्वाद देवाले उनात. त्यास्ना मी आभारी शे. आठे ना लोकेस्ना जिव्हाळ्याना प्रकल्पांकरता सहभागी हुई राहीनू. त्याना आनंद शे', असे मोदी यांनी म्हणताच त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने जनसमुदायाने प्रतिसाद दिला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT