अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha) आणि नाग चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या घटस्फोटाबाबत नागार्जुन (Nagarjuna) यांचं वक्तव्य गुरुवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'इंडियाग्लिट्झ'ने एक मुलाखत चालवली, ज्यामध्ये नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी असा दावा केला की समंथाला विभक्त व्हायचं होतं आणि नाग चैतन्यला कुटुंबाच्या प्रतिष्ठेची काळजी होती. आता, नागार्जुन यांनी ट्विट करत हे विधान पूर्णपणे खोटं आणि निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. (Nagarjuna on Samantha & Naga Chaitanya Divorce)
नागार्जुन यांचं ट्विट-
'समंथा आणि नाग चैतन्य यांच्याबद्दल सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवत असलेलं माझं विधान पूर्णपणे खोटं आणि निरर्थक आहे. मी विनंती करतो की कृपया बातम्या म्हणून अफवा पोस्ट करणं टाळावं,' असं त्यांनी ट्विटरवर स्पष्ट केलं आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात समंथा आणि नाग चैतन्य यांचा घटस्फोट झाला. २०१७ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. समंथा आणि नाग चैतन्य ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. समंथा आणि नाग चैतन्य या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोटाबाबतची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वीच समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून घटस्फोटाबाबतची पोस्ट डिलिट केली.
घटस्फोटाबाबत काय म्हणाला नाग चैतन्य?
आगामी चित्रपटासाठी प्रमोशन करताना नाग चैतन्य घटस्फोटाविषयी व्यक्त झाला. "आम्ही दोघांनी एकमेकांच्या आनंदासाठी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यात काही वाईट नाही. जर ती खूश असेल तर मीसुद्धा खूश आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत घटस्फोट हाच निर्णय योग्य वाटतो", असं तो म्हणाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.