1ashok_chavan_3.gif
1ashok_chavan_3.gif 
मराठवाडा

सरकारला खाली खेचल्यानंतरच अच्छे दिन : अशोक चव्हाण

पंजाब नवघरे

वसमत : ''राज्यासह देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत आता या सरकारला खाली खेचल्यानंतरच नागरिकांना अच्छे दिन पाहायला मिळतील.'' , असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी (ता. २७) केले.

 काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार अॅड. राजीव सातव, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, डी पी सावंत, आमदार डॉक्टर संतोष टारफे, माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज राजाराम खराटे, शंकरराव कऱ्हाळे, सीमा हाफीज, प्रीती जयस्वाल, रवीकिरण वाघमारे, खालेद शाकेर,नदीम सौदागर , अॅड. ऋषिकेश देशमुख, साईनाथ जाधव उपस्थित होते

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, ''जनतेला भूलथापा देऊन भाजपा सरकार सत्तेवर आले आहे. निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनांची त्यांनी पूर्तता केलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारने अद्याप अच्छे दिन आणले नाही. त्यामुळे आता सरकार खाली खेचल्यानंतरच जनतेला अच्छे दिन येतील.'' , असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यामध्ये शासकीय योजनांचा पुरता बोजवारा उडाला असून रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्याचे कंत्राट घेणार कंत्राटदार अर्धवट काम सोडून पळून गेले आहेत. यासाठी सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारला सत्तेचा माज आल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत देखील आता बेताल वक्तव्य करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसचीच असणार असून याठिकाणी काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव पुन्हा एकदा विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. वसमत विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत द्यावे त्यानंतर विधानसभेची जागा पक्षश्रेष्ठीकडे  पाठपुरावा करून कॉंग्रेसला सोडवून आणूत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी डॉक्टर एम.आर. क्यातमवार यांच्या कामाचे कौतुक केले.


सुचक वक्तव्याची चर्चा
वसमत  मध्ये प्रथमच काँग्रेसची मोठी सभा अनुभवत असल्याचे सांगत चव्हाण यांनी डॉक्टर क्यातमवार यांचे कौतुक केले. त्यामुळे त्यांच्या या सूचक वक्तव्यातून आगामी विधानसभा निवडणुकीत डॉक्टर क्यातमवार हे काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : दोन हेवी वेट संघ भिडणार, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

SCROLL FOR NEXT