मराठवाडा

लेकीच्या नावाने वाढली गुंतवणूक

प्रकाश बनकर

औरंगाबाद - आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करीत पालक वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करीत असतो. याच अनुषंगाने लेकीच्या नावाने होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याचे सुखद चित्र शहरात आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक पालकांनी केली आहे. या योजनेत सप्टेंबर २०१७ ते ३१ डिसेंबरपर्यंत जवळपास  दोन लाख सहा हजार खाती उघडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दरवर्षी या गुंतवणुकीत दहा टक्‍क्‍यांनी वाढ होत असल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.

टपालासह राष्ट्रीयीकृत बॅंकांतर्फे ही योजना राबविण्यात येत आहे. यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने नऊ हजार २७० खाते उघडले आहेत. तर एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ३० हजार ८३७ खातेधारकांनी टपालात खाती उघडली. सुकन्या समृद्धी योजनेसाठी जमा रक्‍कम एक हजारहून २५० रुपयांवर आणल्याने खाते उघडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. योजना सुरू झाल्यापासून सुकन्या समृद्धीत गुंतवणुकीसाठी टपाल विभागात पैशांचा पाऊस पडत आहे. आकर्षक ८.३ टक्के व्याजदर, कर सवलत असल्याने आपल्या लाडक्‍या लेकींच्या भविष्यासाठी पालकांचा खाती उघडण्याकडे वाढता कल आहे.

अशी आहे सुकन्या समृद्धी योजना 
योजनेत पालक कन्येच्या नावाने जवळच्या कोणत्याही टपाल कार्यालयात खाते उघडू शकतात. एक पालक किंवा कायदेशीर पालक जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाती उघडू शकतो. गुंतवणुकीसाठी मुलीचे वय १० वर्षांच्या आत हवे. मुलीचा जन्माचा दाखला व पालकाची केवायसी कागदपत्रे खाते उघडण्यासाठी आवश्‍यक आहेत; मात्र या खात्यामध्ये वारस नेमण्याची सुविधा नाही. २५० रुपये भरून खाते उघडता येते. त्यानंतर १०० च्या पटीत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. या खात्यात वर्षात कमीत कमी एक हजार रुपये भरणे आवश्‍यक आहे. न भरल्यास खाते खंडित होईल व पुनरुज्जीवित करण्यासाठी ५० रुपये दंड आकारण्यात येतो. यामध्ये मुलीचे वय १८ झाल्यास किंवा त्यापुढे असल्यास ५० टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम काढता येते. मुलीचे वय २१ झाल्यावर खाते बंद करता येईल. १८ व्या वर्षीच लग्न झाल्यास मुदतपूर्वसुद्धा बंद करता येते.

मोठे यश
भारतीय टपाल खात्यात सुकन्या समृद्धी योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. टपाल विभागात लोकांनी स्वतःहून येत आपल्या मुलींच्या नावांनी खाती उखडली आहेत. टपालात औरंगाबाद विभागात खानदेशचासुद्धा समावेश होतो. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, भुसावळ, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत एक एप्रिल ते ३१ डिसेंबरपर्यंत ३० हजार ८३७ जणांनी खाती उघडली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT