garbage
garbage 
मराठवाडा

कचऱ्यातून निघतायेत धुरांचे लोट

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची कोंडी तब्बल 26 दिवसांनंतरही कायम असून, कचऱ्याच्या साचलेल्या ढिगाला आता नागरिकच आगी लावत आहेत. त्यातून निघणाऱ्या धुराच्या लोटांमुळे परिसरातील नागरिकांचा श्‍वास गुदमरत आहे. बुधवारी (ता. 14) कचऱ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापौर, पदाधिकाऱ्यांना संतप्त महिलांनी घेराव घालून जाब विचारला. दरम्यान, शासनाने कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आणखी दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

शहराची कचराकोंडी सोडविण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन कामाला लागल्याचे चित्र उभे केले जात असले, तरी 26 दिवसांनंतरही हजारो टन कचरा विविध भागांत पडून आहे. त्याला नागरिक आगी लावत आहेत. ओल्या-सुक्‍या कचऱ्यातून निघणाऱ्या धुराच्या लोटांमुळे परिसरातील नागरिकांना श्‍वास घेणे अवघड झाले आहे. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पदाधिकारी पाहणीसाठी गेले असता, पदमपुरा भागात संतप्त महिलांनी हा धूर कधी बंद होणार, असा जाब विचारला. अग्निशामक विभागाला पाचारण करून कचऱ्याला लागलेली येथील आग विझविण्यात आली. विभागीय आयुक्तांनी शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावर काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, व्यापारी महासंघाची बैठक घेऊन सहकार्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT