Vehicle Fancy Number Plate
Vehicle Fancy Number Plate 
मराठवाडा

‘दादा, मामा, तात्यां’वर होणार कारवाई

सकाळवृत्तसेवा

बीड - शहरात अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर असून आता या वाहनधारकांवर पोलिस प्रशासनाने जास्त लक्ष केंद्रित केले असून यापुढे व्हीआयपी नंबर टाकणाऱ्या दुकानदारांवर व वाहनधारकांवर पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार आहे.

शहरातील अनेक वाहनांवर नियमांच्या पलीकडे जाऊन फॅन्सी नंबर टाकण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही वाहने प्रतिष्ठित नागरिकांची आहेत. तर काही वाहने सर्वसामन्यांची आहेत. अनेक वेळा चोरटे अशी वाहने चोऱ्या करण्यासाठी वापरतात. यामुळे ज्या वेळेस चोरीच्या ठिकाणी असे वाहने असतात, त्या वेळी या वाहनांचा नंबर ओळखण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे आता पोलिस प्रशासनाने अशा वाहनांवर व ज्या दुकानात हा नंबर टाकण्यात आला आहे त्यांच्यावर कार्यवाईचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील दादा, मामा, तात्या, काका असे नंबर वाहनांवर टाकणाऱ्या वाहनधारकांना हे नंबर काढून नियमानुसार नंबर टाकावे लागणार आहेत.

पोलिसांनी मंगळवारी येथील नंबर टाकणाऱ्या दुकानदारांची बैठक घेतली व यांची माहिती दिली.‘‘सध्या शहरातील ज्या अनेक वाहनांवर फॅन्सी नंबर टाकले आहेत. त्यांनी हे नंबर बदलून नियमाप्रमाणे नंबर टाकावे, यासह प्लेटचा वापर फक्त नंबर टाकण्यासाठीच करावा. या संदर्भात आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. येथून पुढे ज्या वाहनांवर फॅन्सी नंबर असेल त्या वाहनांवर कडक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहील.   
- सुधीर खिरडकर, पोलिस उपअधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT