मुंबई

कल्याण: भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मिळणार मदत 

रविंद्र खरात

कल्याण : तालुक्‍यातील म्हारळ गावात अतिवृष्टीमुळे रविवारी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी शासनातर्फे प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत लवकरच दिली जाईल, अशी माहिती कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांनी 'सकाळ'ला दिली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी पहाटे पाच वाजता अतिवृष्टीमुळे म्हारळमध्ये घराची भिंत कोसळली. यात सैफुद्दीन अल्लाऊद्दीन खान (वय 45) आणि इस्लाम निजामुद्दीन शेख (45) यांचा मृत्यू झाला; तर परवेश बन्सलराज सिंग (26), फिरफोस इस्लाम महंमद शेख (38), खुशबू सैफुद्दीन शेख (16), नीलम प्रवेश सिंग (28) हे जखमी झाले. त्यांच्यावर उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघातात किरकोळ जखमी झालेल्या 11 वर्षांच्या सोना महंमद इस्लाम शेख या मुलीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तहसीलदार कार्यालयामार्फत या दुर्घटनेचा अहवाल बनवून मदतीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांसाठी आठ लाख रुपयांचा मदतनिधी तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. 'मयतांच्या वारसांची ओळख पटवून हा निधी त्यांना दिला जाईल', असे अमित सानप यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT