Representational Image
Representational Image 
मुंबई

नितीन आगे हत्या प्रकरण : 'तपास अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा' 

सकाळवृत्तसेवा

ठाणे : अहमदनगर जिह्यातील खर्डा येथे नितीन आगे याची 28 एप्रिल 2014 मध्ये हत्या झाली होती. यात 13 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 26 साक्षीदार असूनही यातून आरोपी निर्दोष सुटणे म्हणजे तपास यंत्रणांचे अपयश आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) संघटनेकडून करण्यात आली आहे. 

बारावीत शिकत असलेल्या नितीन राजू आगे याला आरोपींनी शाळेतून मारहाण करत आरोपींच्या वीटभट्टीवर नेले होते. त्यानंतर डोंगरातील झाडाला त्याला गळफास लावून त्याची निर्घृण हत्या केली होती. या हत्या प्रकरणात गावातील 13 जणांविरुद्ध हत्या करणे, तसेच ऍट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. 

नितीन आगे हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभर रिपाइं एकतावादीच्या वतीने आंदोलने छेडण्यात आली होती.

या खून खटल्यात साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवल्याने त्यांना फितूर घोषित करण्यात आले. खटल्यात नितीनचे वडील राजू, आई यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती; मात्र आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवले. हे आरोपी निर्दोष सुटण्यामागे तपास अधिकाऱ्यांचे अपयश नसून त्यांनी जाणीवपूर्वक परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात हयगय केली असल्याचा आरोप भय्यासाहेब इंदिसे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घाणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

SCROLL FOR NEXT