kalyan railway station
kalyan railway station  
मुंबई

मेल एक्सप्रेस गाडीच्या प्रवाशांना तिकीट घराचा आडोसा

रविंद्र खरात

कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकातुन मेल आणि एक्स्प्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . या प्रवाशांसाठी कल्याण रेल्वे स्थानकात प्रतिक्षालय बनविले आहे , मात्र त्यात जागा अपुरी असल्याने अनेकांना फलाट आणि स्टेशनजवळील तिकीट घराचा आडोसा घेऊन थंडी गारठ्यात वाट पहावी लागत असल्याने या प्रवासी वर्गाला सुसज्ज प्रतिक्षालय बनवावे या मागणीला जोर धरू लागला आहे . 

कल्याण रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे . कल्याण रेल्वे स्थानकातून लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या मधून प्रति दिन साडे पाच लाख प्रवासी प्रवास करतात , यामुळे 24 तास कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी वर्गाची वर्दळ सुरू असते . बहुतांश बाहेर गावातून येणाऱ्या मेल गाड्या रात्री आणि मध्यरात्री येतात त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाश्यांचे चांगलेच हाल होतात. दरम्यान मुंबईत  देशभरातून प्रतिदिन अंदाजे 1650 मेल , एक्सप्रेस गाड्या येतात तर यातील 800 ते 850 मेल, एक्सप्रेस गाड्या कल्याण रेल्वे स्थानकात येतात जातात . यातून अंदाजे प्रतिदिन एक ते दिड लाख प्रवासी प्रवास करतात.

लांब पल्ल्याच्या मेल,  एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात फलाट पाच वर प्रतिक्षालय आहे , मात्र त्यात अपुरी जागा असल्याने अनेक प्रवाश्याना फलाट , पादचारी पूल , कल्याण पश्चिम मधील रेल्वे तिकीट घराच्या परिसराचा आडोसा घेऊन बसावे लागत आहे .वर्षाच्या बारा महिन्यात उन्हाळा , पावसाळा , हिवाळा मध्ये प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होतात . सध्या थंड वातावरण असल्याने अनेक ठिकाणी धुके असल्याने अनेक तास मेल एक्सप्रेस गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाश्याचे चांगलेच हाल होत आहे . यामुळे प्रतिक्षालय बनविण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे . 

विमानतळा प्रमाणे प्रतिक्षालय बनविण्याची मागणी

विमानतळाप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानक बाहेर रेल्वे च्या जागेत सुसज्ज प्रतिक्षालय बनविण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे . सध्या कल्याण रेल्वे स्थानकात 4 आणि 5 वर प्रतिक्षालय आहे , मात्र मेल गाडी 5 आणि 6 फलाटवर आल्यावर प्रवासी वर्गाची तारांबळ उडते आहे , त्यामुळे एकाच ठिकाणी सुसज्ज प्रतिक्षालय बनविल्यास तेथे प्रवासी बसेल आणि गाडी येण्याची सूचना मिळताच पुढे जाईल अशी व्यवस्था करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे .

मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , तेथे प्रवासी वर्गासाठी प्रतिक्षालय आहे मात्र ते अपुरे असून नव्याने सुसज्ज प्रतिक्षा बनविण्यात येणार आहे , त्याबाबत एक प्रस्ताव बनविला असून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविला असून त्याची मंजुरी मिळताच पुढील अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT