मुंबई

चंडिका देवीच्या यात्रेत नाटकांची मेजवानी

CD

विरार, ता. २५ (बातमीदार) : वसईतील जूचंद्र या गावातील नाट्य मंडळे, भजनी मंडळे आपली कला संपूर्ण जिल्ह्यात सादर करत असतात. या गावाने नाटकाची १५८ वर्षांची परंपरा आजही जोपासली असून आता तरुण पिढीही कला पुढे नेत आहे. पूर्वी बाहेरच्या लेखकांची नाटके सादर होत होती, तर आता गावातीलच लेखक तयार झाले असून त्यांची नाटके सादर केली जात आहेत. जूचंद्रची ग्रामदेवता असलेल्या चंडिकेची यात्रा शुक्रवार (ता. २६) पासून सुरू होत असून २८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा फड रंगणार आहे.

नाट्य भजनी मंडळाच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या जूचंद्र गावाचे पहिले भजनी मंडळ म्हणजे आर्य ज्ञानोत्तेजक होय. साधारणत: १८६५-६६ च्या दरम्यान सीताराम केशव म्हात्रे, टोकू मुका यांनी मंडळाची स्थापना केली. त्याकाळी कसलेल्या नटांनी सुरुवातीला विषारी सुरा, माझी जमीन, सवता सुभा, कृष्ण-अर्जुन युद्ध, संगीत सौभद्र, द्रौपदी वस्त्रहरण असे एकाहून एक श्रेष्ठ नाट्यप्रयोग सादर केले. यानंतर श्री चंडिकेच्या यात्रेत सलग दोन दिवस नाट्यप्रयोग सादर करण्याची परंपरा आजही टिकवून ठेवलेल्या बावनचाळ नाट्य मंडळाची स्थापना शाहू सुला, गणपत दगडू, वामन गोपाळ यांनी केली. या मंडळाने दत्तात्रेय पाटील, गोपीकिसन पाटील, अनंत म्हात्रे, रवींद्र पाटील, दिग्दर्शक किसन यशवंत, अरुण गजान यांच्या नेतृत्वाखाली नाटके सादर केली. ही परंपरा तरुण पिढी चालवत असून यावर्षी यात्रेत २६ एप्रिलला ‘मन्या चालला दुबईला’ आणि २७ एप्रिलला ‘आयला मेलो रे’ ही दोन नाटके सादर होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT