भिवंडी, ता. ३ (वार्ताहर)ः पालिका प्रशासनाने मालमत्ताधारकांवर जल, मल करात वाढ केली आहे. ही करवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी भिवंडी पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भिवंडी शहरातील मालमत्ता करामध्ये अन्यायकारक दरवाढ, शहरातील स्वच्छता, काँक्रीट रस्त्यांची कामे या प्रश्नांवर मंगळवारी रविकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजप पदाधिकारी राजू गाजंगी, विशाल पाठारे, कल्पना शर्मा, शाम भोईर, भावेश पाटील, प्रवीण मिश्रा, अशोक जैन, ॲड. नंदन गुप्ता, भरत भाटी, मंगेश यादव, विकास बाफना, प्रतीक हरिया, प्रदीप पाटील, आदित्य शेटे, सुमित दोढिया, आशीष संघवी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी आयुक्त अजय वैद्य यांच्या प्रशासकीय कार्यकाळात शहरातील मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित होत असल्याने त्याच्या देखभाल व निगा, दुरुस्तीसाठी निधी उभा राहावा, या हेतूने ठराव करून निवासी मालमत्तांवर १८ टक्के तर वाणिज्य मालमत्तांवर २३ टक्के जल मल प्रवाह लाभ कर लावला आहे. येत्या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता करामध्ये वाढ होणार असल्याने दरवाढ ही अन्यायकारक असल्याचे रविकांत सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच पालिका प्रशासन शहरातील मालमत्ता कराची अवघी २० टक्के वसुली करीत आहे. काही ठरावीक भागातूनच ही वसुली होत असल्याने प्रामाणिक करदात्यांवर अतिरिक्त बोजा पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.