मुंबई

बिबट्याच्या हल्ल्यात बकरीचा बळी

CD

बिबट्याच्या हल्ल्यात बकरीचा बळी
चिखले गावातील शेतकरी चिंताग्रस्त
बोर्डी, ता. २१ (बातमीदार) : डहाणू तालुक्याच्या समुद्रकिनारी वसलेल्या चिखले गावात बिबट्याची दहशत वाढू लागली आहे. रविवारी (ता. २०) रात्री व सोमवारी पहाटे बिबट्याने चिखले काकड पाडा येथील शेतकरी रवी खोचे यांच्या गोठ्यातील बकऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये एका बकरीचा जीव गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मागच्या अनेक महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागच्या आठवड्यात काकड पाडा भागात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून होते. त्यानंतर बोर्डी वन विभागाचे वनसंरक्षक प्रशांत भोसले यांनी घटनास्थळाला भेट देऊन ते ठसे बिबट्याचेच असल्याची खातरजमा करण्यात आली होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन वन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

------------------------------
बिबट्याचा वावर असल्याचे पुरावे
चिखले गावपरिसरात सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. येथील शेतकऱ्यांच्या बकऱ्या, गुरेढोरे हा येथील अविभाज्य भाग आहे, तर दुसरीकडे बिबट्या आणि जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे येथील शेतीला अनेक समस्यांनी ग्रासले असल्याची प्रतिक्रिया चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजित काटेला यांनी सांगितले.
-----------------------

अभिजित काटेला यांचा कोट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी लग्नाची पत्रिका द्यायला गेलो अन" सचिन पिळगावकरांनी सांगितला संजीव कुमारांचा अखेरचा क्षण; म्हणाले..

Mumbai : १० वर्षांच्या मुलावर निर्जनस्थळी अत्याचार, आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन तर एक १८ वर्षांचा

Champions League T20: चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२०चे पुनरुज्जीवन ? आयसीसीकडून सभेत चर्चा; भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा

Satara Crime: घरफोडीप्रकरणी महिलेला अटक; शाहूपुरी पोलिसांकडून दहा तोळ्यांचे दागिने हस्तगत

Chess Tournament: बुद्धीबळाचा विश्‍वकरंडक भारतामध्ये; २३ वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरमध्ये आयोजन

SCROLL FOR NEXT