devotes celebration in Pandharpur for Air strike
devotes celebration in Pandharpur for Air strike  
पश्चिम महाराष्ट्र

आध्यात्मिक राजधानी पंढरपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष

भारत नागणे

पंढरपूर : भारतीय सैनिकांनी पाकवर केलेल्या हल्ल्याचे देशभरात स्वागत आणि जल्लोष साजरा केला जात असतानाच आध्यात्मिक राजधानी पंढरपुरात ही विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व येथील मंदिर परिसरातील व्यापार्यांनी  फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

14 फेब्रुवारी ला पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बाॅम्ब हल्ला केला होता. यामध्ये 40 हून अधिक भारतीय सैनिक शहीद झाले. भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यावी, अशी देशातील सर्वसामान्य जनतेची मागणी होती.

त्यानंतर आज पहाटे भारतीय हवाई दलाच्या जवानांनी  पाकिस्तान मधील  बालाकोट येथील दहशतवादयाच्या तळांवर हवाई हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. उरी हल्ल्यानंतर ही मोठी कारवाई मानली जाते.

भारतीय सैनिकांनी दहशतवादी तळांवर कारवाई केल्याची माहिती मिळताच देशभरात हवाई सैनिकांचे कौतुक केले जात आहे. आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भाविकांनीही मंदिर परिसरात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी 'भारत माता की जय...', 'पाकिस्तान मुर्दाबाद..' , 'तोड दो...तोड दो.. पाकिस्तान तोड दो' अशा घोषणा देत भारतीय सैनिकांचे अभिनंदनही केले.

यावेळी राजू कौलवार, अवधूत बडवे, प्रभाकर कौलवार, कौस्तुभ गुंडेवार, गणेश गुंडेवार, चिदंभर गोटेकर, भाऊसाहेब घाटे, अमर श्रीखंडे, विजय सावंत, सौरभ बडवे आदींसह भाविक व नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT