raju shetti aakrosh morcha
raju shetti aakrosh morcha sakal
कोल्हापूर

आठ दिवसांत मदत द्या,अन्यथा नृसिंहवाडीत जलसमाधी; शेट्टींचा इशारा

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत मिळाली नाही तर 1 सप्टेंबर 2021 ला हजारो कार्यकर्त्यांसह नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. पूरग्रस्तांना तातडीने मदत निधी मिळावा, पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी तसेच शेतकऱ्यांना ही 50 हजार रुपयांचा निधी मिळावा यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते.

1 सप्टेंबर 2021 ला हजारो कार्यकर्त्यांसह नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेण्याचा इशारा..

पूरग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी केलेल्या आक्रोश आंदोलनात आज असंख्य महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. आम्हाला नाही मिळालाच पाहिजे, या सरकारचं करायचे काय खाली डोकं वर पाय, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

अशा आहेत मागण्या

  • 2019 च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा

  • पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा

  • कृष्णा व पंचगंगा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पुल बांध

  • पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट ही तसेच शैक्षणिक कर्ज माफी करा.

  • 2005 ते 2019 पर्यंत चार मोठे महापूर आले या महापुरामुळे नदीकाठची अनेक गावे उध्वस्त झाली‌ आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यासगट नेमून त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT