पश्चिम महाराष्ट्र

साखर कारखानदारांच्या दारात आंदोलनाची हिम्मत शेट्टींची नाही - सदाभाऊ खोत

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर -  साखर कारखानदारांच्या दारात आंदोलन करण्याची खासदार राजू शेट्टी यांची हिम्मत नसल्याचा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लावला. येथे कृषी क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

साखर कारखान्यांनी एफआरपीमध्ये मोडतोड करून ८०-२० असा फॉर्म्युला वापरून ऊस बिले जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला आहे. तसेच ज्या कारखान्यांनी पैसे जमा केले आहेत त्या कारखान्यांवर आणि गट कार्यालयावर संघटनेने हल्लाबोल सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री सदाभाऊ खोत यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. 

या वेळी खोत म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांत कधी एफआरपीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली नाही. आता उद्योग अडचणीत असून सरकार प्रयत्न करत आहे. मात्र आम्हाला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या काही नेत्यांनी घेतेली होती. कारण हे नेते निवडणुकीवर डोळा ठेवून वाटचाल करत आहेत. त्यांची अडचण झाली आहे.’’

ते म्हणाले,‘‘आंदोलन करण्यास लाखभर लोक लागत नाहीत, दगड भिरकावला की आंदोलन होते. मात्र कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. जर आंदोलन थांबले नाहीतर इट का जवाब पथर से देंगे, असा इशाराही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT