Karkhana
Karkhana sakal
सोलापूर

आजपासून ऑपरेशन ‘चिमणी’! श्री सिद्धेश्वर कारखाना परिसरात ४००० पोलिसांचा बंदोबस्त; वीजपुरवठा बंद केला जाणार

तात्या लांडगे

सोलापूर : विमानसेवेला अडथळा ठरणारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशनची अनधिकृत ९२ मीटर उंचीची चिमणी पाडकामाची तयारी आता महापालिका प्रशासनाने केली आहे. ‘ऑपरेशन चिमणी’ राबवून आगामी दोन-तीन दिवसात कारवाई फत्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कारखाना परिसरात तब्बल चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

श्री सिद्धेश्वर कारखाना प्रशासनाने को-जनरेशनची ९२ मीटर उंच चिमणी उभारताना संबंधित यंत्रणांची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रामुख्याने चिमणी होटगी रोड विमानतळासाठी प्रमुख अडथळा असल्याचेही अनेक निष्कर्ष निघाले आहेत. त्यामुळे अनेक लढाया लढूनही कारखाना प्रशासनाला चिमणी वाचविण्यात यश मिळाले नाही. त्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कारखान्याला ४५ दिवसांची मुदत देत चिमणी पाडून घेण्याची नोटीस बजावली

पण, कारखान्याने काहीच केले नसल्याने त्यांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. त्यासाठी जालना, सोलापूर शहर-ग्रामीण, सोलापूर राज्य राखीव पोलिस बदल, मुंबई, नवी मुंबई येथून मोठा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. १३ ते १७ जूनपर्यंत हा बंदोबस्त तैनात असणार आहे.

दरम्यान, ‘ऑपरेशन चिमणी’ राबविताना कारखाना परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात संचारबंदी (कलम १४४) लागू करण्याचे आदेश काढले आहेत. १८ जूनपर्यंत ते आदेश लागू असणार आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.

कारवाईवेळी बंद राहणार कारखान्यातील लाइट

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पोलिस, महावितरण अशा कारवाईच्या संबंधित सर्वच विभागप्रमुखांशी बैठकीत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही कारवाईवेळी कारखान्यातील वीज पूर्णपणे बंद करावी, अशा सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मागच्यावेळी महावितरणचे अधिकारी वीज कनेक्शन तोडायला गेल्यावर काहीजण तेथील ट्रान्स्फॉर्मर चढले होते. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना आल्या पावली परतावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेऊन आता कारवाई करताना कारखान्याचे वीज कनेक्शन डिस्कनेक्ट केले जाणार आहे.

कामगार, शेतकऱ्यांचे अश्रू अनावर

श्री सिद्धेश्वर कारखाना हजारो सभासद व कामगारांची आर्थिक नाडी आहे. त्यांची रोजीरोटी कारखान्यावर अवलंबून आहे. चिमणी पाडल्यावर आमचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे मायबाप सरकारने चिमणी पाडकामाची कारवाई थांबवावी, अशी मागणी माध्यमांसमोर करताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. तरीपण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आल्याने चिमणी पडणार असल्याची खात्री झालेल्या कामगार व शेतकऱ्यांनी ‘आम्हाला गोळ्या घाला अन्‌ चिमणी पाडा’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे उद्या (बुधवारी) नेमके काय होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

पहिल्यांदा कारखाना निर्मनुष्य करणार

पोलिसांकडून बुधवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास ‘ऑपरेशन चिमणी’ची सुरवात होण्याची शक्यता आहे. कारखान्यातील व परिसरातील सर्वच कामगार, शेतकऱ्यांना पोलिसांच्या माध्यमातून बाहेर काढले जाणार आहे. कारखाना परिसर निर्मनुष्य झाल्यानंतर मक्तेदाराच्या मशिनद्वारे चिमणी पाडकाम होईल, असे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT