There is a demand for residents of river area to permanently release water from the river Sina solapur
There is a demand for residents of river area to permanently release water from the river Sina solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सीनेचं पाणी पुन्हा पेटणार! 

अशोक मुरुमकर

सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व उस्मानाबाद, नगर जिल्ह्यातील सीनेकाठच्या गावांना उपयोग होत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण या महत्त्वाकांक्षी योजनेत सीना नदीचा समावेश करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मांडलेल्या कृष्णा- भीमा स्थिरीकरण योजनेवरून राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे भाजपचे उमेदवार निंबाळकरही अनपेक्षित मताधिक्‍याने माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. उजनी धरणासाठी करमाळा तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र गेले असले तरी संपूर्ण भागात पाणी पोचलेले नाही. तालुक्‍याच्या पूर्व भागाला सीना नदीच वरदायिनी ठरलेली आहे. मात्र, या नदीत आता कायम पाणी राहत नाही. त्यामुळे सतत या भागाला टंचाईचा सामना करावा लागतो. नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे म्हणून अनेकदा आंदोलने झाली. परंतु अद्याप नदीत पाणी आलेले नाही. काही वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील चौंडी येथून कुकडच्या कालव्याद्‌वारे सीना नदीत पाणी आले होते. कुकडीचे पाणीही आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नाने कामोणेपर्यंत आले आहे. तेच पाणी पुढे सोडले तर यातीलही काही गावांचा प्रश्‍न सुटू शकेल. सीना नदीवर करमाळा तालुक्‍यातील खडकी, तरटगाव, पोटेगाव, संगोबा येथे कोल्हापुरी पद्धतीचे लघु पाटबंधारे आहेत. या बंधाऱ्यात पाणी येणे आवश्‍यक आहे. 

सीना काठच्या गावात कायम पाणी नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या नदीवर कोळगाव येथे धरण आहे. त्यातही पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. बंधाऱ्यात पाणी आले तर धरणातही पाणी सोडता येऊ शकते. पाणी नसल्यामुळे तरुण रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करत आहेत. शेतीसह या भागातील गावांना पाणीपुरवठा व्हावा, म्हणून पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत. परंतु दरवर्षी पाण्याअभावी त्या बंद पडत आहेत. 

सीना काठच्या गावांना नेहमी दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. कायमस्वरूपी पाणी नसल्याने स्थलांतर वाढत आहे. त्यामुळे गावे ओस पडू लागली आहेत. पुन्हा या भागाला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर नदीत कायमस्वरूपी पाणी सोडून प्रश्‍न मार्गी लावणे गरजेचे आहे. 
- डॉ. अमोल घाडगे, सरपंच, तरटगाव 

भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीत दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे. त्यामुळे करमाळा तालुक्‍यातील पूर्व भागाची पाण्याची समस्या कायमची सुटेल. सोलापूरसह नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांचा यामुळे फायदा होणार आहे. 
- प्रा. शशिकांत नरुटे, बोरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT