Vikram-Pavaskar
Vikram-Pavaskar 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhansabha 2019 : आठपैकी सहा जागांवर भाजप सांगणार हक्क

सकाळ वृत्तसेवा

सातारा - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर सातारा जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात किमान चार आमदार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मिशन २०१९ अंतर्गत सातारा जिल्ह्यात बांधणी केली आहे. पाटण आणि फलटण वगळता उर्वरित सहा मतदारसंघांवर भाजपने दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार असल्यामुळे साताऱ्यात नेमकी काय परिस्थिती राहणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. गेल्या पाच वर्षांत युतीच्या सत्ता काळात भाजपने जिल्ह्यात ‘मायक्रो प्लॅनिंग’ करून पक्षसंघटना वाढविली आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सात सदस्य निवडून आणले आहेत. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चार आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलविण्याचा प्रयत्न यशस्वी करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. त्यातच आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आल्याने आता साताऱ्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ते पश्‍चिम महाराष्ट्रात अधिक ताकदीने उतरून ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला संपविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार युतीच्या जागा वाटपात भाजप जिल्ह्यातील पाटण व फलटण विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित सहा मतदारसंघांची मागणी करणार आहे. कारण या सहाही ठिकाणी भाजपकडे सक्षम उमेदवार आहेत. तसेच यावेळेस फलटण मतदारसंघ मित्रपक्षांना सोडण्याची तयारी केली आहे.

पण, नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जर फलटण मतदारसंघाची मागणी केल्यास तोही भाजपकडे घेतला जाईल. त्या बदल्यात इतर मतदारसंघाची अदलाबदल केली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेने जरी पाच विधानसभा मतदारसंघांवर दावा केला असला तरी भाजपकडे सहाही मतदारसंघांत सक्षम उमेदवार आहेत. परिणामी प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे चंद्रकांत पाटील सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारसंघ भाजपकडे घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. यास शिवसेना कितपत साथ देणार, त्यावर आगामी निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. शिवसेनेकडे असलेल्या कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, वाई या मतदारसंघांत भाजपकडे सक्षम उमेदवार असून, तेच ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवाराशी चांगल्या प्रकारे लढत देऊ शकणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील साताऱ्यासाठी कोणती चाल खेळणार? यावर जिल्ह्यातील युतीची गणिते अवलंबून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT