Kiren Rijiju  sakal
पुणे

Kiren Rijiju : सरकार मुस्लिमांची जागा काढून घेणार नाही

कायद्यात बदल करून केंद्र सरकार मुस्लिमांच्या जमिनी काढून घेणार असल्याचा अपप्रचार काही जण करत आहेत. ही चुकीची मांडणी व दिशाभूल करण्याचे प्रकार त्वरित थांबले पाहिजेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वक्फ बोर्डाच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारने मांडलेले विधेयक हे मुस्लिमांच्या जागा काढून घेण्यासाठी तयार केलेले नाही तर जागांचा बेकायदेशीर व गैरवापर बंद व्हावा, मुस्लिमांच्या हितासाठी त्या जागांचा वापर व्हावा यासाठी विधेयक मांडले आहे. या विधेयकावर कोट्यावधी नागरिकांनी त्यांच्या सूचना केल्या आहेत. त्यांचा विचार केला जाईल, असे केंद्रीय संसदीय व अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

पुण्यात कार्यक्रमासाठी आलेले असताना रिजिजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रिजिजू म्हणाले, कायद्यात बदल करून केंद्र सरकार मुस्लिमांच्या जमिनी काढून घेणार असल्याचा अपप्रचार काही जण करत आहेत. ही चुकीची मांडणी व दिशाभूल करण्याचे प्रकार त्वरित थांबले पाहिजेत. या वक्फ बोर्डाच्या कायद्यातील सुधारणांना मुस्लीम समाजातील अनेक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. सव्वा कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी हरकती सूचना पाठवल्या आहेत. हा एक जागतिक विक्रम आहे. इतक्या हरकती सूचना येतील, असा विचार केले नव्हता. हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे.

आतिशी रिमोट कंट्रोल

आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शेजारी एक रिकामी खुर्ची ठेवली आहे. त्याचा काही अर्थ नाही. त्या पुढील काही महिने एक रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री असणार आहेत. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून कोणतेही काम करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत, असे रिजिजू यांनी सांगितले.

जातीवादातून विभाजन योग्य नाही

महाराष्ट्रात भाजपने युती सरकारमध्ये चांगल्या पद्धतीने काम केले आहे, केंद्र सरकारचेही सहकार्य आहेत, त्यामुळे राज्यातील जनता महायुतीला पाठिंबा देईल. पण राज्यात जातीवादीतून समाजात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते योग्‍य नाही अशी टीका रीजिजू यांनी विरोधकांवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT