water tanks demolished
water tanks demolished sakal
पुणे

Katraj News : जीर्ण पाण्याच्या टाक्या महापालिकेकडून अखेर जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - राजस सोसायटी परिसरातील रामभाऊ म्हाळगी शाळेच्या आवारातील जीर्ण पाण्याच्या टाक्या महापालिकेकडून पाडण्यात आल्या आहेत. त्या जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला होता. याबाबत मागील अनेक दिवसांपासून शाळेकडून पाठपुरावा केला जात होता. मात्र, प्रशासनाला जाग येत नव्हती. त्यानंतर पाण्याच्या जीर्ण टाक्याचा विद्यार्थ्यांना धोका या मथळ्याखाली सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून याची दखल घेत जॉ कटरच्या सहाय्याने या टाक्या पाडण्यात आल्या आहेत. या टाक्या पाडल्याने विद्यार्थी आता निश्चिंत झाले असून कुठल्याही प्रकारचा धोका राहिला नसल्याची माहिती रामभाऊ म्हाळगी शाळेकडून देण्यात आली.

यावेळी माजी नगरसेविका राणी भोसले, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नितिन खुडे, शाखा अभियंता संदिप मिसाळ, संस्थेचे अध्यक्ष प्रविण ठाकूर, सचिव भालचंद्र खराईत, चित्रा ताम्हणकर, रायबा भोसले, मुख्याध्यापिका आरती राठोड, यशवंत हरिभक्त उपस्थित होते.

प्रतिक्रिया

आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यास मान्यता दिल्याने या धोकादायक टाक्या जमीनदोस्त करण्यात आल्या. आता विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

- नितीन खुडे, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, India vs Ireland: टीम इंडियाची विजयी सलामी, आयर्लंडला केलं चारीमुंड्या चीत; कर्णधार रोहितचे शानदार अर्धशतक

Rohit Sharma: रोहितचा टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम; विराट-बाबरच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Mahesh Gaikwad : कल्याण पूर्वचे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

Modi Cabinet: श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, धर्यशील मानेंना केंद्रात मंत्रीपदं मिळणार - सूत्र

INDIA vs NDA: मोदींना सत्तेतून खेचणार? ही तर लोकांची ईच्छा, योग्य वेळी पाऊले उचलणार; सत्तास्थापनेबाबत खर्गे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT