पुणे

पीएमआरडीए वॉटर फंड आकारणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहेत. वाघोली आणि पिरंगुट परिसरातील पाच गावांसह काही ठिकाणी पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी पीएमआरडीएकडून वॉटर फंड आकारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्‍त किरण गित्ते यांनी दिली. 

पीएमआरडीएच्या या फंडातून प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. परिसरातील बांधकाम प्रकल्पांना परवानगी देताना विकसकांकडून प्रत्येक सदनिकेमागे वीस हजार रुपये इतका निधी आकारण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी परवानगी दिलेल्या बांधकाम प्रकल्पांकडून हा निधी घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शहरालगतच्या भागात नागरीकरण झपाट्याने होत आहे. तेथील नागरिकांना ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांना परवानगी देताना प्रकल्पाला पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतींकडून दिले जाते. ही बाब ग्राह्य धरून पीएमआरडीएकडून मान्यता दिली जाते. परंतु, नागरिकांकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी येतात. या संदर्भात गित्ते म्हणाले, ""पीएमआरडीएने पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाघोली येथे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्प बांधण्यात येणार आहे. त्यासाठी वढूच्या बंधाऱ्यातून पाणी घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच, पिरंगुट, सूस, म्हाळुंगे, बावधन आणि भूगाव या पाच गावांसाठी सुमारे दोनशे कोटींची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.'' 

पाणीवाटप समितीची स्थापना 
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पाणीवाटप समिती स्थापन करण्यात आली आहे. नगरविकास सचिव, महापालिका आयुक्‍त, जलसंपदाचे मुख्य अभियंता आणि पीएमआरडीएचे आयुक्‍त यांचा या समितीमध्ये समावेश असल्याचे गित्ते यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT