Sakal Survey
Sakal Survey 
पुणे

Sakal Saam Survey: ईडीचा वापर विरोधकांवर दबावासाठी ? मोदींवर होणाऱ्या आरोपाबद्दल जनतेचं मत..

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : केंद्रातील भाजप्रणित एनडीए सरकारला अर्थातच मोदी सरकारला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली. या नऊ वर्षांच्या कलावधीत सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तसेच या काळात देशात अनेक घडामोडी देखील घडल्या. पण विरोधकांनी यावरुन सरकारला वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. याद्वारे सरकार विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. या मुख्य आरोपांसह इतर आरोपांबाबत महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं? याची माहिती सकाळच्या सर्व्हेमधून समोर आली आहे. (Sakal Saam Survey on Narendra Modi Government of Nine years)

विरोधकांनी सरकारवर केलेले आरोप

  1. नोटाबंदीचा निर्णय फसला

  2. देशात धार्मिक तेढ वाढलं

  3. जातीय तणावात वाढ

  4. ठराविक उद्योजकांनाच लाभ देण्याचं धोरण

  5. बेरोजगारीत वाढ

  6. अर्थव्यवस्थेत आल्या अडचणी

  7. केंद्रीय तपाय तंत्रणांचा वापर करुन विरोधकांवर दबाव

  8. संविधानिक मुल्यांची पायमल्ली होतेय

या आरोपांबाबत महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समुहानं सर्व्हेक्षणाच्या (Sakal Survey) माध्यमातून केला आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघात हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेला ४८,७८० लोकांनी प्रतिसाद दिला असून आपली मतं व्यक्त केली आहेत. (Latest Marathi News)

जनतेनं मोदी सरकारवरील आरोपांबाबत भाष्य करताना नोटाबंदी आणि बेरोजगारीबाबत सर्वाधिक नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये अनुक्रमे १५ टक्के आणि १४.२० टक्के लोकांनी सरकारील आरोपांत तथ्य असल्याचं म्हटलंय. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांवर दबाव टाकण्यात येत असल्याच्या आरोपांवर ९ टक्के नागरिकांनी तथ्य असल्याचं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT