पुणे

जलसंपदा खात्यात कर्मचाऱ्यांच्या टंचाई

CD

माळेगाव, ता. १२ : नीरा डावा कालव्यांतर्गत जलसंपदा खात्यात सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची (वर्ग २ ते वर्ग ४) अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज खिळखिळे झाले आहे. त्यातून नीरा नदीवरील बंधाऱ्यांची देखभाल-दुरुस्ती करणे, तसेच नीरा डावा कालव्यावरील सिंचन व्यवस्थेपासून ते पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित ठेवणे जलसंपदा खात्याला कठीण होऊन बसले आहे.
कमी कर्मचाऱ्यांमुळे कालवा अचानक फुटणे, पाण्याची गळती न थांबणे, पाणी पुरवठा योजनांसह सिंचन व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष देता येत नसणे, आदी समस्यांमुळे उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हाल पहावयास मिळत आहे. कर्मचारी टंचाईचा फटका थेट शेतकऱ्यांच्या सेवासुविधेला बसला आहे. या समस्येबाबत शासनदरबारी संबंधित प्रशासनाचा पत्रव्यवहार झाला आहे. परंतु, त्या पत्रांना शासनाने केराची टोपलीच दाखविल्याचे सध्यातरी स्पष्ट होते.
नीरा डावा कालव्याची लांबी १५२ किलोमीटरची आहे. नीरा नदीची हद्दही तितक्याच लांबीची आहे. नीरा डावा कालव्याचे वयही जवळपास दीडशे वर्षाचे झाले आहे. अशा स्थितीत या नदीचे व कालव्याचे व्यवस्थापन सुस्थितीत ठेवण्यासाठी जलसंपदा खाते अक्षरशः झगडत आहे.

नीरा डावा कालव्याअंतर्गत पणदरे उपविभागाअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०३ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये शाखा अभियंता, कालवा निरिक्षक, मोजणीदार, पाटकरी, कालवा टपाली, कालवा मजूर, संदेशक, दप्तरी कारकून आदी पदांचा समावेश आहे. मागील पाच वर्षांचा आढावा घेतला असता सध्याला येथे केवळ २९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामधील तीन कर्मचारी जूनअखेर सेवानिवृत्त होत आहेत, तर पाच कर्मचारी बदली प्रक्रियेच्या यादीमध्ये आहेत.
एका बाजूला मनुष्यबळाची ही प्रतिकूल स्थिती, तर दुसऱ्या बाजूला जीर्ण झालेला कालवा आणि नीरा नदीची मोठी हद्द विचारात घेता जलसंपदा विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा दुष्काळ पडल्याचे दिसून येतो. या समस्येमुळे कालवा अचानक फुटणे, पाण्याची गळती न थांबणे, पाणी पुरवठा योजनांसह सिंचन व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा सेवासुविधा मिळत नाहीत आणि उपलब्ध अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण वाढला आहे.

पणदरे उपविभागात प्रमोद दिवेकर या शाखा अभियंत्याकडे गतवर्षीपासून चार शाखांचा कारभार आहे. त्यामध्ये वडगाव निंबाळकर पाटबंधारे शाखा, पणदरे शाखा, माळेगाव आणि मळद शाखेचा समावेश आहे. पाणी वापर संस्थांकडे लक्ष देणे, नीरा नदी बंधाऱ्यांवरील देखभाल दुरुस्ती व बांधकामाची पाहणी करणे, नीरा डावा कालव्याअंर्गत जीर्ण झालेल्या मातीच्या भराव्यांचे मजबुतीकरण करून घेणे, सिंचन व्यवस्था सुस्थिती ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित ठेवणे, आदी कामे करणे मनुष्यबळाच्या अभावी प्रशासनाला जिकिरीचे झाले आहे. अशा प्रतिकूल स्थितीत शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना सेवासुविधा पुरविण्यासाठी उपविभागीय अभियंता प्रवीण घोरपडे, शाखा अभियंता दिवेकर यांची मोठी कसरत होताना दिसते.

पाणी पुरवठा योजनांकडे नाही पुरेसे लक्ष
नीरा डाव्याअंतर्गत पणदरे उपविभागामध्ये सोमेश्वर साखर कारखाना, माळेगाव कारखाना, बारामती दूध संघ, पणदरे एमआयडीसी आदी उद्योग धंद्यांना पाण्याचा पुरवठा करावा लागतो. तसेच, माळेगाव, सांगवी, शिरवली, कांबळेश्वर आदी गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजे आहे. परंतु, प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्याकामी पुरेसे लक्ष देता येत नाही. या उपविभागामध्ये कार्यरत असलेल्या ३० पाणी वापर संस्थांचे सुनियोजन करणे उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांना मर्यादा येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT