यवत, ता. ११ : शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडवावी, असे आवाहन ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.
खामगाव (ता. दौंड) येथे कृषी विभाग, ॲग्रिकल्चर ॲण्ड डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम पूर्व पीक नियोजन अभियान कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पवार बोलत होते. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्पादन वाढवण्याचे आणि शेतीला अधिक फायदेशीर करण्याचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे समजावून सांगितले.
यावेळी आत्माचे महेश रुपनवर, उप कृषी अधिकारी मनोज मिसाळ व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी शेतकऱ्यांना कांदा, हरभरा, गहू व ऊस या रब्बी हंगामातील प्रमुख पिकांविषयी मार्गदर्शन केले. पीक व्यवस्थापन, खत आणि पाणी नियोजन याबद्दल त्यांनी माहिती दिली.
सहाय्यक कृषी अधिकारी विनायक जगताप यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘महाविस्तार AI ॲप’ (Mahavistar AI App) विषयी माहिती दिली.
तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी मेळाव्यास खामगावचे सरपंच जगन्नाथ नागवडे, बापूसाहेब थोरात, शांताराम नागवडे, प्रदीप जगताप, शैलेश पंडित, शंकर नागवडे, विलास नागवडे, विठ्ठल बर्वे, हिंदुराव खताळ, गौतम हिंगणे, महादेव गरड, देवराम टिळेकर, बाळासाहेब मोडक, गोविंद नागवडे, दत्ता महाडीक, कौस्तुभ माने, दत्तोबा पिंगळे, योगेश खेडेकर यांसह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
01507
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.